Jataayu

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आधी काही वर्षे संजीवन समाधी घेतली होती शिवयोगी सिद्धरामांनी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी काही वर्षे संजीवन समाधी घेतलेले आध्यात्मिक महापुरुष, शिवयोगी सिद्धराम. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेली सोलापूरनगरी (प्राचीन नाव सोन्नलगी) ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी 68 शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली. देवळे बांधली, चार हजार लोकांच्या र्शमदानातून तलाव खोदले, गरीब व निरार्शितांसाठी अन्नछत्र सुरू केले. सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. महात्मा बसवेश्वर यांचे समकालीन असलेले सिद्धराम समाजसुधारक, योगी तसेच एक संवेदनशील भावकवीही होते. अलौकिक कार्यामुळे ते सोलापूरचे ग्रामदैवत बनले. सिद्धेश्वर आणि …

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आधी काही वर्षे संजीवन समाधी घेतली होती शिवयोगी सिद्धरामांनी Read More »

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनात स्वामी विवेकानंद यांचे असे दिसते प्रतिबिंब

23 डिसेंबर 1910 रोजी विनायक सावरकरांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बंदिवासातील पहिल्या दिवसाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना सप्तर्षी नावाच्या प्रदीर्घ कवितेत ते म्हणतात की, मी गेल्या सहा महिन्यांपासून विवेकानंदांच्या राजयोग पुस्तकाचा अभ्यास करत आहे. अंदमानला जाण्यापूर्वी त्यांच्या ज्या गोष्टी जप्त करून लिलाव करण्यात आल्या त्यात राजयोग हा ग्रंथही होता. 1912 च्या डिसेंबरमध्ये त्यांचा लहान भाऊ नारायण यांनी त्यांना निवडक पुस्तके पाठवली. त्यात …

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनात स्वामी विवेकानंद यांचे असे दिसते प्रतिबिंब Read More »

राष्ट्रवाद : ३६० अंशातून या ग्रंथाची निर्मिती ३० हून अधिक विचारवंतांच्या योगदानातून

देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रवाद या विषयावर देशातील 30 हून अधिक विचारवंतांचा सहभाग घेऊन राष्ट्रवाद 360 अंशातून या विशेष ग्रंथाची निर्मिती जटायु अक्षरसेवा ने केली. महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ठसा उमटवणारी ही निर्मिती आहे. सत्यासाठी प्राण पणास लावणारा, अन्यायाचा प्रतिकार करणारा जटायु आमच्या आदर्शस्थानी आहे. केवळ अन्याय रोखणे याच एकमेव उद्देशाने जटायु पुढे सरसावला. शक्तिशाली असलेल्या रावणाशी कडवी झुंज दिली. आपल्या पश्चात आपल्या आप्त – स्वकियांचे …

राष्ट्रवाद : ३६० अंशातून या ग्रंथाची निर्मिती ३० हून अधिक विचारवंतांच्या योगदानातून Read More »

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे शक्तीशाली विचार सर्वसामान्यांपर्यंत कधी आलेच नाहीत

ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बोैद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। …

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे शक्तीशाली विचार सर्वसामान्यांपर्यंत कधी आलेच नाहीत Read More »

वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे, असे स्वामी विवेकानंद का म्हणाले, जाणून घेऊया…

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी …

वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे, असे स्वामी विवेकानंद का म्हणाले, जाणून घेऊया… Read More »

जटायु अक्षरसेवासाठी गौरवाची बाब

देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना सोलापूरची अमूल्य भेट म्हणून श्रीमंती सोलापूरची हा ग्रंथ सुपूर्द करण्यात आला. जटायु अक्षरसेवासाठी ही बाब गौरवाची आहे. सोलापूर सोशल फाऊंडेशन या संस्थेने सोलापूरच्या बलस्थानांवर आधारित कॉफी टेबल बुक (विशेष ग्रंथ) निर्मितीची जबाबदारी जटायु अक्षरसेवा कडे सोपवली. दर्जेदार कंटेट… स्क्रीप्ट रायटिंग, विषयांची निवड, छायाचित्रण, संपादन, छपाई, बांधणी या अनेक …

जटायु अक्षरसेवासाठी गौरवाची बाब Read More »

ॠषी बंकिम मराठीतील पहिले चरित्र

वंदे मातरम्या महामंत्राला आम्ही जवळ केलं तेव्हा धर्मांच्या आधारे केलेली या देशाची-बंगालची फाळणी रद्द झाली. वंदे मातरम्ला अंगीकारण्यात आम्ही संकोच केला तेव्हा या भारतवर्षाचे तुकडे पडले. आमच्याच भूमीवर पाकिस्तान, बांग्लादेश उगवले. या देशाची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य वंदे मातरम् या महामंत्रात आहे… मातृभूमी प्रेमाचा शाश्वत आविष्कार साकारणार्‍या बंकिमचंद्रांचे जीवनकार्य ॠषीतुल्य आहे. आजच्या पिढीला प्रेरक आहे. …

ॠषी बंकिम मराठीतील पहिले चरित्र Read More »

Scan the code