Jataayu

ऋषी बंकिंमचंद्र

तब्बल 128 वर्षांची प्रतीक्षा संपली. राष्ट्रभक्तीचा महामंत्र ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्यावरील मराठीतील पहिले चरित्र प्रकाशित होत आहे. ग्रंथाचे नाव – ऋषी बंकिमचंद्रलेखक – मिलिंद सबनीसप्रकाशक – जटायु अक्षरसेवापृष्ठे – सुमारे 240मूल्य – 599/-संपर्क : 9767284038#ऋषी_बंकिमचंद्र #rishi_bankimchandra #swaraj75

Outing justo morbi wild

Aliquam sed in egestas gravida amet mattis sagittis, semper morbi vitae, egestas blandit duis facilisis adipiscing fermentum aenean nunc nibh accumsan, ornare enim at interdum mi arcu, ut magna ultrices odio dictumst aliquam tincidunt dictum pharetra vestibulum aliquam aliquet suspendisse. Sed et aliquam tincidunt ut sed porttitor nunc et etiam molestie arcu donec venenatis nulla nunc massa tellus mauris vitae lorem sit semper natoque fusce lectus urna. Pellentesque viverra Mauris viverra mi sollicitudin est nunc, tincidunt risus massa nunc proin ipsum fames aliquet vel etiam nulla pretium magna quam a porta vitae eget pellentesque nunc malesuada at nisi purus orci, fermentum consectetur iaculis eu morbi elit mauris in felis massa in vitae parturient purus magna aliquet phasellus odio in suscipit arcu amet, magna molestie in iaculis augue condimentum cras molestie vestibulum pharetra risus.

Eget elementum on train

Aliquam sed in egestas gravida amet mattis sagittis, semper morbi vitae, egestas blandit duis facilisis adipiscing fermentum aenean nunc nibh accumsan, ornare enim at interdum mi arcu, ut magna ultrices odio dictumst aliquam tincidunt dictum pharetra vestibulum aliquam aliquet suspendisse. Sed et aliquam tincidunt ut sed porttitor nunc et etiam molestie arcu donec venenatis nulla nunc massa tellus mauris vitae lorem sit semper natoque fusce lectus urna. Pellentesque viverra Mauris viverra mi sollicitudin est nunc, tincidunt risus massa nunc proin ipsum fames aliquet vel etiam nulla pretium magna quam a porta vitae eget pellentesque nunc malesuada at nisi purus orci, fermentum consectetur iaculis eu morbi elit mauris in felis massa in vitae parturient purus magna aliquet phasellus odio in suscipit arcu amet, magna molestie in iaculis augue condimentum cras molestie vestibulum pharetra risus.

Visit sagittis malesuada vestibulum

Aliquam sed in egestas gravida amet mattis sagittis, semper morbi vitae, egestas blandit duis facilisis adipiscing fermentum aenean nunc nibh accumsan, ornare enim at interdum mi arcu, ut magna ultrices odio dictumst aliquam tincidunt dictum pharetra vestibulum aliquam aliquet suspendisse. Sed et aliquam tincidunt ut sed porttitor nunc et etiam molestie arcu donec venenatis nulla nunc massa tellus mauris vitae lorem sit semper natoque fusce lectus urna. Pellentesque viverra Mauris viverra mi sollicitudin est nunc, tincidunt risus massa nunc proin ipsum fames aliquet vel etiam nulla pretium magna quam a porta vitae eget pellentesque nunc malesuada at nisi purus orci, fermentum consectetur iaculis eu morbi elit mauris in felis massa in vitae parturient purus magna aliquet phasellus odio in suscipit arcu amet, magna molestie in iaculis augue condimentum cras molestie vestibulum pharetra risus.

विवेकानंदांनी शिकागोत सांगितलेला विचारच आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुळाशी

पुणे । एकांतिक धर्मीयांच्या छळाला कंटाळून स्वत:चा धर्म आणि जीव वाचवण्यासाठी जगातील इतर देशातून पळून आलेल्या जीवांना ज्या देशाने सदैव आश्रय दिला त्या देशातून आल्याचे व त्या सहिष्णू हिंदू धर्माचा प्रतिनिधी असल्याचे स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात ठासून सांगितले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यातून तोच विचार नरेंद्र मोदी कृतीत आणत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी या जटायु अक्षरसेवा प्रकाशित ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कोथरूडच्या स्वस्तिक सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महापौर मुरलीधर मोहोळ, रा. स्व. संघाचे रवींद्र वंजारवाडकर, ग्रंथाचे संपादक संतोष जाधव, गोसेवा प्रमुख रवींद्र रबडे, पत्रकार सिद्धाराम पाटील आदी उपस्थित होते. देशविदेशातील 27 विद्वानांच्या चिंतनशील लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. अमेरिकेतील विद्वान डेव्हिड फ्रॉली, केंद्रीय गृहमंत्रालयात अवर सचिव राहिलेले आरव्हीएस मणी, ज्येष्ठ पत्रकार अभिलाष खांडेकर, यमाजी मालकर, रमेश पतंगे, विवेक घळसासी, तुषार दामगुडे, मिलिंद कांबळे, वेणु धिंगरा, प्रमोद डोरले, अरुण करमरकर, अभिराम दीक्षित, विजय तिवारी आदी लेखकांचा यात समावेश आहे. 9767284038 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या अन् ग्रंथ मागवा अशी वाचक केंद्र पद्धत वापरल्याचे जाधव यांनी सांगितले. या ग्रंथातील एक लेखक असलेले श्री. तोरसेकर म्हणाले, नरेंद्र ते नरेंद्र अशी सव्वाशे वर्षांची भारताची वाटचाल या ग्रंथात आहे. ब्रह्मर्षी हा विचार असतो. तो कृतीत आणतो तो राजर्षी असतो. स्वामींनी मिळालेल्या मोजक्या मिनीटात आपल्या मोजक्या शब्दांनी जग जिंकले होते आणि मोदींनी मिळालेल्या मोजक्या संधींचा नेमका उपयोग करून आज जग आपल्या मताशी जुळवून घेऊन इथपर्यंत वेळ आणली आहे. एक स्वभावाने व जगण्याने संन्यासी होता आणि दुसरा राजसत्तेवर आरुढ झालेला असला तरी मनाने व स्वभावाने संन्याशीच राहिलेला आहे. कुटुंब नातेगोते वा संसारी जीवनावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलेला हा संन्याशी ब्रह्मर्षी नाही, तर राजर्षी आहे, असे ते म्हणाले.संपादक संतोष जाधव म्हणाले, आज भारतवर्षाची विविध क्षेत्रांत होत असलेली वाटचाल, धोरणांतील स्पष्टता आणि कणखर नेतृत्व पाहता जगद्गुरू भारताची लक्षणे ठळक होताना दिसत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, अगदी किशोर वयापासून ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी आपले जीवन घडवले, त्याग आणि सेवा हे भारतवर्षाचे शाश्वत आदर्श ज्यांनी आपली जीवननिष्ठा बनवली, अशी समर्पित व्यक्ती आज नेतृत्वस्थानी आहे. नव्या भारताची पायाभरणी सुरू आहे. अशा वेळी जगद्गुरू भारत (स्वामी विवेकानंद) आणि नवा भारत (नरेंद्र मोदी) या संकल्पनांची सजग चर्चा व्हावी, राष्ट्रीयतेचे विविध आयाम समोर यावेत, या दृष्टीने या ग्रंथाची निर्मिती केली आहे. पुस्तकाचे नाव : ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदीपृष्ठे : 276, मूल्य : 400/-पुस्तक मागवण्यासाठी पुढील लिंकवर जा…http://jataau.com/shop

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक स्मरणिका

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला (डीसीसी) 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार केलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन पार्क मैदान येथील भव्य कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी मान्यवर नेते उपस्थित होते. या स्मरणिकेची आकर्षक छपाई करण्याची संधी जटायु अक्षरसेवा ला मिळाली होती.

Awaran

भारतील “दा-विंची कोड’

अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या “स्व’त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी – आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी…

स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल स्वातंत्र्यसंग्रामातील प्रसिद्ध नेत्यांची काय भावना होती, पाहूया…

लोकमान्य टिळक : दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी : सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले. बिपिनचंद्र पाल : बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली. गोपाळकृष्ण गोखले : गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत. (संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई) वि. दा. सावरकर : क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती. महात्मा गांधी : आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस : सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. रवींद्रनाथ टागोर : रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला. जवाहरलाल नेहरू : चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते… आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते. इंदिरा गांधी : इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले. सर्वपल्ली राधाकृष्णन : डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले. डॉ. एपीजे कलाम : डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे. नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.

मूलनिवासी थोतांड मांडणाऱ्या तथाकथित पंडितांना स्वामी विवेकांनंदांनी कोणत्या शब्दांत सुनावले वाचा

जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्‍या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे पॅरिसच्या परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. भारतीय आणि युरोपीय पंडितांशी मी याबद्दल वेळोवेळी बोलत आलो आहे. आर्य बाहेरून आले या सिद्धान्तावरचे माझे आक्षेप मी वेळ मिळताच सविस्तर रीतीने मांडणार आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग निष्कर्ष काढा. युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पाश्‍चिमात्य लोक आपापल्या देशातल्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहून तिथे सुखात राहीलेअसते तर त्यांना जगात ऐदी, उनाड समजण्यात आले असते. म्हणून त्यांना जगात सर्वत्र भटकावे लागले. जिथे ते गेले तिथे त्यांनी कत्तली केल्या, दरोडे घातले, लोकांची संपत्ती लुटली. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तसेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे ! कोणत्या वेदात नि कोणत्या सूक्तात असे लिहिलेले आहे की, आर्य बाहेरच्या देशातून आले ? कुठे पुरावा आहे की, त्यांनी एतद्देशीयांच्या कत्तली केल्या ? असल्या वेडपट गोष्टी बोलून तुम्हाला काय मिळते ? रामायणाचा तुमचा अभ्यास व्यर्थ आहे. आपल्या सोयीची एक कपोलकल्पित गोष्ट तुम्ही रामायणावरून रचली आहे इतकेच ! रामायणात आहे तरी काय ? दक्षिण भारतातील अनार्य जमातींचा आर्यांनी केलेला पराभव. अहा ! काय पण प्रतिभा ! रामचंद्र हे आर्य सम्राट होते ना ? त्यांचे युद्ध कोणाबरोबर चालले होते ? – लंकेचा सम्राट रावण याच्याबरोबर. जरा रामायण वाचा म्हणजे कळेल की, रावण हा रामापेक्षा काकणभर जास्तच विद्वान होता. लंका ही अयोध्येपेक्षा समृद्ध होती. आणि वानरांवर किंवा दक्षिण भारतीयांवर रामचंद्रांनी विजय तरी केव्हा मिळविला ? – ते तर सारे रामचंद्रांचे मित्र आणि सहकारीच होते. वाली आणि गुहक यांची राज्ये खालसा करून रामाच्या राज्याला जोडली होती काय? – हा खुळेपणा आता पुरे !

वंदे मातरम या विषयावर सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी युवा पत्रकार सिद्धाराम भै. पाटील यांची मुलाखत

इतिहास विसरल्यास प्रेरणा लुप्त होते. प्रेरणा जागी राहिली नाही तर माणसाची अधोगती सुरु होते. माणसे लाचार बनतात. कणाहीन माणसांची समाजात संख्या वाढू लागली की स्वार्थ बोकाळतो. स्वार्थ बोकाळला की देशभक्ती मागे पडते. देशभक्ती गौण मानणाऱ्यांच्या हाती नेतृत्व आले की देशाचा सत्यानास होतो. याचा दाहक अनुभव या देशाने अनेकदा घेतला आहे. वंदे मातरमच्या स्फूर्तीदायी इतिहासाकडे स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षच झाले. त्या इतिहासाची उजळणी व्हावी यासाठी ही मुलाखत येथे सादर करत आहोत. २००७ साली सोलापुरातील वृत्तदर्शन या स्थानिक टीव्ही वाहिनीवर वंदे मातरम या विषयावर सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी युवा पत्रकार सिद्धाराम भै. पाटील यांची मुलाखत घेतली होती. वन्दे मातरम् part 1 वन्दे मातरम् part 2 वन्दे मातरम् part 3 वन्दे मातरम् part 4

Scan the code